Monday, April 22, 2013

Valachi Khichadi (वालाची खिचडी / डाळींब्यांचा भात )

ही खिचडी आमच्या कोकणात फार लोकप्रीय आहे.  खरतरं ही फक्त नावानेच  खिचडी आहे, आहे हा बिरड्याचा (वालाचा) मसालेभात … एकदा नक्की बनवा, नक्कीच पुन्हा पुन्हा बनवत राहाल.



Read this recipe in English.......

साहित्य:
  • उत्तम प्रतीचा जुना तांदूळ - २ कप (बासमती घेण्याची गरज नाही, आंबेमोहर किंव्हा कोलम तांदूळ वापरावा)
  • मोड आणून सोललेले वाल- १ १/२  ते २ कप
  • चिरलेला कांदा- २ कप
  • चिरलेला टोमाटो- १ कप
  • ठेचलेला लसूण- १ टेबलस्पून (या भातासाठी आले अजिबात वापरू नका. आल्याची चव बिरड्याची चव घालवतो)
  • राई/ मोहरी- १ टीस्पून
  • जीरे- १ टीस्पून
  • हिंग- १/४ टीस्पून
  • हळद- १/२ टीस्पून
  • घरगुती मसाला / मिरची पूड- ४ ते ५ टीस्पून
  • गोडा मसाला- २ टीस्पून
  • खिसलेला गूळ- १/४ टीस्पून किंव्हा चिमुटभर (एच्छिक)
  • तेल- ५ ते ६ टेबलस्पून
  • गरम पाणी- ४ ते ४  १/४ कप (खास कोकणी चवीसाठी नारळाच दुध २ कप + पाणी २  १/४ कप वापरा)
  • मीठ चवीनुसार
  • बारीक चिरलेली कोथिंबीर- १/४ कप
  • खवलेले ओले खोबरे- १/४  कप (नारळाचे दुध वापरणार असाल तर खोबरे वापरण्याची गरज नाही. ) 
  • साजूक तूप- जरुरीनुसार (एच्छिक)

कृती:
  • तांदूळ आणि वाल धुउन  बाजूला ठेवावेत.
  • एका जड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून मोहरी टाकावी. 
  • ती तडतडली कि जीरे, लसूण, कांदा टाकावा. कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा.
  • नंतर त्यात हळद, हिंग, मसाला टाकून जर परतावा. 
  • त्यात वाल, टोमाटो आणि १/४ कप खोबरे आणि गोडा मसाला टाकून मिनिटभर परतून घ्यावा. 
  • नंतर त्यात तांदूळ आणि मीठ टाकून छान एकत्र करून जर वेळ परतून घ्यावे. 
  • नंतर त्यात गरम पाणी टाकून १५ ते २० मिनिटे झाकण लाऊन भात शिजवावा. 
  • नंतर त्यात गूळ टाकून हलक्या हाताने हलउन छान एकत्र करून २ वाफा काढाव्यात. खिचडी तयार.
  • ही खिचडी प्रेशर कुकरमध्ये पण शिजवता येते.
  • वाढताना वरून कोथिंबीर आणि खोबर आणि थोडस तूप टाकावे. 
  • गरमागरम खिचडी कैरीची कढी किंव्हा टोमाटो सार बरोबर वाढावी


3 comments:

  1. Do you mean either one should use hot water or coconut milk and not both. Otherwise it will be 8+1/2 cup, which 'll make khichadi a paste. Please explain.

    ReplyDelete
    Replies
    1. २ कप तांदूळ घेतले तर .......
      तांदूळ नवा असेल तर ४ कप , तांदूळ जुना असेल तर थोड पाणी जास्त घ्या.

      नारळाचे दुध वापरणार असाल तर ...२ कप पाणी + २ कप दुध = ४ कप
      किंव्हा ३ कप पाणी + १ कप दुध = ४ कप

      Delete
  2. फोडणीत शहाजिरे घातले तर छान वास येतो खिचडीला

    ReplyDelete

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.