Monday, November 3, 2014

वरी तांदूळाचा भात आणि शेंगदाण्याची आमटी

आषाढी आणि कार्तिकी एकादशी स्पेशल :
वरी तांदूळाचा भात शेंगदाण्याच्या आमटीबरोबर मस्त लागतो.पण मी दिलेल्या पद्धतीने जर वरीचा भात केला तर नुसत्या उपवासाच्या बटाट्याची भाजी आणि दह्यासोबत किंव्हा उपवासाच्या चटणी सोबत सुद्धा छान लागतो. 

४ जणांसाठी
वरी तांदूळाचा भात 
साहित्य:
वरी तांदूळ (उपासाची भगर)- १ कप
गरम पाणी- २ + १/२ कप
तूप किंव्हा शेंगदाणा तेल - २ टेबलस्पून
जिरे- १ टिस्पून
हिरवी मिरची- १
खवलेले ओले खोबरे- २ टेबलस्पून
मीठ- चवीप्रमाणे

कृती:
वरी तांदूळ तांदूळ सोनेरी तपकीरी रंगावर भाजावेत.
पातेल्यात तूप गरम करावे, त्यात मिरची, जिरे व खोबरे घालून थोडे परत वे. त्यात वरी तांदूळ घालून थोडावेळ परतावे.
त्यात गरम पाणी घालावे व चवीनुसार मिठ घालून ढवळावे आणि पातेल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर वरी तांदूळ शिजू द्यावा.
जर एकदम मऊसर भात/भगर हवी असेल तर पाण्याचे प्रमाण वाढवावे. पण या पद्धतीचा वरीचा भात मऊ चांगला लागत नाही.   
.................................................. ..................................................
शेंगदाण्याची आमटी 
साहित्य:
भाजलेले आणि सोललेले शेंगदाणे- १ कप
बटाटे- २ मध्यम (ऐच्छिक )
लाल मिरची पूड- २ ते ४ टिस्पून (आवडीप्रमाणे)
जिरे- १ टीस्पून
काळी मिरी दाणे - ४
तूप किंव्हा शेंगदाणा तेल -२ टेबलस्पून
पाणी- अंदाजे २ + १/२ कप ते ३ कप
गूळ किंवा साखर- चिमुटभर किंव्हा चवीनुसार (ऐच्छिक )
मीठ- चवीप्रमाणे

कृती:
प्रथम दाणे , जिरे आणि पाणी एकत्र करून मिस्करमध्ये बारीक वाटून घ्यावे.
बटाटा सोलून त्याचे छोटे तुकडे करावेत.
कढईत तूप गरम करून त्यात मिरे घालून फोडणी करावी. बटाट्याच्या फोडी,मिरची पूड व जरासे मीठ घालून परतून घ्याव्यात. थोडेसे पाणी घालून झाकण ठेऊन शिजत ठेवा. 
बटाट्याच्या फोडी शिजत आल्या कि त्यामध्ये दाण्याचे वाटण घालावे.त्यात पाणी, मिठ आणि गूळ घालावे.
बटाटा शिजल्यावर उकळी काढून गरमागरम वरीच्या भाताबरोबर वाढावे.

No comments:

Post a Comment

आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.