Read this recipe in English......click here.
साहित्य:
- उकडलेले बटाटे- ४ (२५० ग्रॅम )
- आरारूट किंव्हा साबुदाणा पीठ- अंदाजे ६ टेबलस्पून
- लाल तिखट- १/४ टीस्पून
- जीरे पूड- १/४ टीस्पून
- ताजे खोवलेले खोबरे - १/२ कप
- मनुका- २ टेबलस्पून
- काजू तुकडे, तळून किंव्हा भाजून - २ टेबलस्पून
- हिरवी मिरची, बारीक चिरून किंव्हा ठेचून- २
- जीरे- १/२ टीस्पून
- साखर- १ टीस्पून किंव्हा आवडीप्रमाणे
- चवीपुरते मीठ
- शेंगदाणा तेल किंव्हा तूप, तळण्यासाठी- आवश्यकतेनुसार
कृती:
- उकडलेले बटाटे कुस्करून किंव्हा किसणीवर किसून घ्यावेत.
- त्यात मिरची पूड, जिरे पूड, मीठ आणि आवश्यकतेनुसार आरारूटचे पीठ घालावे. व्यवस्थित मळून मऊसर गोळा बनवावा.
- मळलेल्या पीठाचे लिंबाएवढे गोळे बनवावे. तेलाच्या हाताने मोदकाच्या पारीप्रमाणे वाटीसारखा किंव्हा पुरी सारखा आकार देऊन त्यात चमचाभर सारण घालून कडा जुळवून कचोरी वळावी. अशाप्रकारे सर्व कचोऱ्या बनवाव्यात.
- पीठात घोळऊन कचोऱ्या मध्यम आचेवर सोनेरी रंगावर तळून काढाव्यात.
- उपवासाच्या चटणीबरोबर किंव्हा गोड दह्यासोबत वाढाव्यात.
सूचना:
- कचोऱ्या गरमच खाण्यास द्याव्यात. थंड झाल्यावर मऊ पडतात त्यामुळे चांगल्या लागत नाही.
- कच्चे सारण आवडत नसेल तर थोड्याश्या तूपावर जिरे, हिरवी मिरची, खोबरे आणि इतर साहित्य नीट परतून सारण बनवावे.
- सारणात चालत असल्यास कोथिंबीर घालू शकता.
- आंबट-गोड चव आवडतं असेल तर सारणात अर्ध लिंबू पिळून घाला.
- कचोऱ्या उपवासासाठी करायच्या नसतील तर आरारूटच्या एवजी कॉर्न फ्लोअर वापरू शकता.
- साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता तश्या ह्या कचोऱ्या गोडसरच असतात.
- वरील प्रमाणात १२ कचोऱ्या होतील.
No comments:
Post a Comment
आपल्या प्रतिसादाने नवीन गोष्टी करण्यास उत्साह मिळतो. आपला अभिप्राय, सुचना आम्हाला ज़रूर कळवा. आपल्या प्रेमाचा वर्षाव असाच कायम राहो.